Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, September 9, 2010

मागील पानावरून परत सुरु......

मला हल्ली असं वाटायला लागलय की आपल्या नाटक, सिनेमा, गाणं सादर करणे आणि बघणे याबद्दलच्या कल्पना जराशा बदलायला हव्यात. आणि असे बदल या स्पर्धांमधून जास्त प्रभावीपणे करता येतील. काहीतरी वेगळ करण्याची, वेळप्रसंगी नकार स्वीकारुन काहीतरी करण्याची तयारी असायलाच हवी. एकंदरीतच कुठलीही performing art प्रेक्षकांना वाजवीपेक्षा महत्त्व देऊन सादर केली की तिच्यातला प्रामाणिकपणा संपतो आणि राहतो तो फ़क्त कोरडा व्यवहार. तुम्हाला हवं ते आम्ही करतो, फ़क्त करंडक द्या किंवा टाळ्या वाजवा, वाहवा म्हणा असा. आणि हल्ली आपल्याकडे हाच व्यवहार तेजीत आहे.
मला प्रश्न असा पडतो की कलाकार किंवा प्रेक्षक यांची परिपक्वता कमी पडू लागली आहे की काय? जरा विचार करा, "आमच्या भावना दुखावल्या" हे वाक्य हल्ली इतक्या वेळा का ऐकू यायला लागलं आहे? काहीच स्वीकारण्याची आपली तयारी नाही? एखादा गाणारा मोठा का, तर तो अगदी हुबेहूब अमक्यातमक्यासारखा गातो म्हणून? किंवा तो एकच एक प्रकारचं गाणं प्रत्येक मेहिफिलित फरमाइशी घे-घेउन गातो म्हणून? काहीही नवीन, चाकोरीबाहेरचं आपण पाहत नाही, ऐकत नाही, लिहित नाही की बोलत नाही. मला खरं सांगा कोणीतरी, पुरुषोत्तम मधे "करून पाहू" असं म्हणून किती नाटकं होतात? किती नवीन फॉर्म हाताळले जातात?एकच एक प्रकारची नाटकं...एक problem , थोड़ा मेलोड्रामा, एक-दोन स्वगतं, विचित्र सेट, एक गोड शेवट किंवा जबरदस्त धक्का..आणि तुम्हाला बक्षिस मिळतं.. मग ही स्पर्धा प्रतिष्ठेची का? कारण ती खूप वर्षं चालू आहे म्हणून? गायक मोठा का? तो खूप वर्षं गातोय म्हणून? मला वाटतं की यात काहीतरी गल्लत आहे. आणि ही गल्लत दोन्ही बाजूंनी आहे.
ज़रा विचार करण्याची गरज आहे, ज़रा धाडस करण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे गरज आहे जरा तारतम्याची. ते जर असेल तर काहीतरी नवीन नक्कीच घडेल!!

No comments:

Post a Comment